आनंदाचा शिधा योजना |
Anandacha shida
Retion card news
Retion card update
Anadacha shida for retion
Ekanath Shinde scheme
नमस्कार, Anandacha shida सध्या राज्यात महायुतीचे सरकारची सत्ता आलेले आहे, पण यापूर्वी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील रेशन धारकांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली होती. ती म्हणजे आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत राज्यातील ग्राहकांना सणासुदीच्या काळात फक्त 100 रुपयांमध्ये पाच वस्तू दिल्या जात होत्या, त्यामध्ये रवा, साखर, चणाडाळ व पामतेल यांचा समावेश करण्यात आलेला होता.
परंतु लोकप्रिय झालेले आनंदाचा शिधा हि योजना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतरित्या बंद करत असल्याचे आज जाहीर केले. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 63 लाख नागरिकांना मिळत होता, मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. याच कारण काय याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूयात.
पीएम आवास योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ | राज्याच्या अर्थसंकल्पनात करण्यात आली मोठी घोषणा |
आनंदाच्या शिधा द्वारे मिळणारा लाभ |
आनंदाचा शिधा योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना सुरवातीच्या काळात अवघ्या शंभर रुपयांमध्ये पाच वस्तूंचा लाभ दिला जात होता, त्यामध्ये एक किलो रवा, एक किलो साखर. एक किलो चणाडाळ आणि एक किलो पामतेल अशा पाच वस्तूंची समावेश करण्यात आलेला होता. ही योजना दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती या सणांच्या निमित्ताने राबवली जात होती. Anandacha shida
योजना बंद ? कारण काय ?
राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच सादर केलेला आहे. यामध्ये राज्यावर मोठे आर्थिक संकट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही, त्यामुळे ही योजना बंद झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र सरकारकडून अधिकृतरित्या कोणतेही ठोक कारण देण्यात आलेले नाही.
अर्थसंकल्पामध्ये विकासावर भर | वीज बिल शून्य, आवास योजनेत 50 हजारांची वाढ | अर्थसंकल्पातील प्रमुख 15 मुद्दे |
लाडकी बहीण योजनेचा परिणाम |
आनंदाचा शिधा योजना बंद करण्यामागे लाडकी बहीण योजनेचा परिणाम असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने लाडके बहिण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येऊन इतर योजनांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Anandacha shida
विरोधकांकडून टीका |
गोरगरिबांना सणाच्या काळात आनंद देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या आनंदाचा शिधा योजना बंद झाल्यानंतर राज्यातील विरोधकांनी सरकारवर जोरदार सडकून टीका केलेली आहे. यामध्ये काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आरोप केला की, निवडणुकीपूर्वी लोकांना गाजर दाखवण्यासाठी ही योजना आणल्या गेल्या आणि आता त्या बंद केल्या जात आहेत. यापूर्वी शासनाकडून शिव भोजन थाळी बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर आता आर्थिक निधीच्या कारणाने आनंदाचा शिरा देखील बंद करण्यात आलेला आहे.
राज्य सरकारवर या निर्णयावर नागरिकांनी विरोधकाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.